Tuesday, December 9, 2008

एक नेहमी पड्नारा प्रश्न "मीच का?"

Saturday, August 16, 2008

गाणे

आयुष्याच्या त्या एका वळणावर
एक गाणे गुणगुणायचे रहीले !
तू समोर येताच
गाणे एक मोहरले मनात
चेहरा तुझा पहाताच
एक गाणे फ़ुलले बहरात
हातात तुझा हात येता
एक गाणे ओठापर्यंत आले
तू आता सोडून दूर जाता
ते गाणे विरले ओठात !!!

कसा तू ?

केसतच तिच्या अडकून पडलास तू
तुलाच कळाले नाही कसा गुंतत गेलास तू !
गालवरच्या त्या लालीने हरवून गेलास सारे तू
पण कसा अशा खोल दरीत उतरत आहेस तू?
अस्मित त्या गुलाबी ओठामुळे,
हास्य तुझे कसे विसरलास तू ?
स्वप्ने तिची रंगवून हातात तिचा हात घेऊन
कोणापासून तरी दूर चाललास तू
आधार देणारे इतरही आहेत
मग कशाला हवाय आधार तिचाच?
आता तरी बाहेर पड या कोशातून
आनंदच भरलाय या जीवानातून!!!

ये पुन्हा एकदा

आलीस घेऊन रन्ग इन्द्रधनूचे जीवनात माझ्या
आलीस तेव्हा तार एक छेडली या मनी माझ्या
सूर उमटले आगळेच काही
सान्गून गेले ते वेगळेच काही !!
आजही इन्द्रधनू तोच अन तार हि तिच आहे
पण सूरच उमटत नाहीत ते
रन्ग हि हरवून गेले सातही ते
स्वप्नहि हरवली आहेत सारी
जीवन ही बनले आहे आता निरळे
येशील न घेऊन ते रन्ग ते सूर पुन्हा एकदा ?